Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्ही पण मोजून पोळ्या बनवता का ? सुख-समृद्धीसाठी सोडा आजच ही सवय

Webdunia
रविवार, 10 जुलै 2022 (12:29 IST)
पोळीसाठी वास्तू टिप्स: काही लोकांना स्वयंपाक करताना घरातील सदस्यांनुसार मोजून रोट्या बनवण्याची सवय असते. रोटी उरणार नाही आणि वाया जाऊ नये म्हणूनही हे केले जाते. अनेकदा तुम्ही घरातील वडिलधाऱ्यांकडून ऐकले असेल की पोळ्या मोजून बनवू नयेत. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने तुम्हालाही अडचणी येऊ शकतात. तुम्हीही मोजून पोळ्या बनवत असाल तर आजपासून हे करणे बंद करा. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्र काय सांगते?
 
मोजून कधीच पोळ्या बनवू नका
वास्तुशास्त्रानुसार पोळ्या कधीही मोजून बनवू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते आणि याचा परिणाम घरातील सुख-समृद्धीवर होतो. असे मानले जाते की मोजून पोळ्या बनवल्याने ग्रहांवरही परिणाम होतो आणि ते आरोग्यासाठीही हानिकारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गहू हे सूर्याचे धान्य आहे आणि त्यामुळे सूर्याचा माणसाच्या जीवनावरही परिणाम होतो. असे मानले जाते की जर स्त्रीने मोजून भाकरी बनवली तर तो सूर्यदेवाचा अपमान मानला जातो. यामुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 
 
गाईसाठी पहिली पोळी बनवा
असे मानले जाते की रोटी बनवताना पहिली पोळी गायीसाठी बनवली जाते. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. यासोबतच सर्व देवी-देवतांचा वास गायीमध्ये असतो त्यामुळे पहिली पोळी गायीची असावी, असेही सांगितले जाते. 
 
कुत्र्यासाठी शेवटची पोळी बनवा
जिथे पहिली पोळी गाईसाठी काढली जाते तिथे शेवटची कुत्र्यासाठी करावी. असे करणे शुभ मानले जाते.
 
पाहुण्यांसाठी पोळी बनवा
हिंदू धर्मात अतिथीला देवाचे रूप मानले जाते. म्हणूनच जेवण बनवताना दोन रोट्या जादा ठेवाव्यात असे मानले जाते. जेणेकरून जेवताना कोणी पाहुणे आले तर ते उपाशी राहू नये. यामुळे माँ अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो.
 
अस्वीकरण: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. वेबदुनिया ने याची पुष्टी केली नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. 

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments