‘तमाम महिला वाचकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!’
मी असं लिहिलेलं पाहून ‘कुटुंबियांच्या’ कपाळावर अठी वगैरे पडलीय का? किंवा चेहऱ्यावरची रेषही हललेली दिसत नाहीय का? या दोन्ही परिस्थितीमध्ये ‘कुटुंबियांनी’ आपल्या घरातल्या किंवा एकूणच समाजातल्या महिलांसंबंधीच्या आपल्या धारणा तपासून घ्यायला हव्यात, एवढाच सल्ला लेखाच्या सुरवातीला देतो. अधिक काही लिहीत नाही.