Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mumbai सीव्हर टँकेत पुन्हा 2 जीवांचा बळी

Webdunia
गुरूवार, 25 एप्रिल 2024 (14:55 IST)
मुंबईतील मालाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. जिथे गटाराच्या टाकीत पडून दोघांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. मालाड (पूर्व) येथील एका बांधकामाधीन इमारतीच्या 35 फूट खोल गटाराच्या चेंबरमध्ये पडून दोन जणांचा मृत्यू झाला, तर एका 19 वर्षीय तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 3.50 च्या सुमारास एक मजूर रहेजा टॉवरखालील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गटाराच्या टाकीत नियमित तपासणीसाठी शिरला. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्याला पाहण्यासाठी आणखी एक व्यक्ती टाकीत शिरली आणि त्यानंतर आणखी एक व्यक्ती टाकीत घुसली. तिघेही बाहेर न आल्याने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.
 
मालाड (पूर्व) येथील राणी सती मार्गावरील पिंप्रीपाडा येथे रहेजा टॉवर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासात निष्काळजीपणा आढळल्यास भादंवि कलम 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
 
श्वासोच्छवासाचे उपकरण परिधान केलेले अग्निशमन दलाचे जवान गटाराच्या टाकीत गेले असता त्यांना सर्वजण बेशुद्धावस्थेत आढळले. गटाराच्या टाकीचा मॅनहोल चेंबर खूपच छोटा होता, त्यामुळे तेथे साचलेल्या वायूमुळे तिघांचा श्वास गुदमरल्याचा संशय आहे.
 
रघु सोलंकी (50) आणि जावेद शेख (36) अशी मृतांची नावे आहेत, तर आकिब शेख (19) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

संबंधित माहिती

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments