Dharma Sangrah

खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण सेवा सुरू

Webdunia
गुरूवार, 11 मार्च 2021 (08:36 IST)
मुंबईमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, पालिका व सरकारी रुग्णालयात लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीने मुंबईतील जास्तीत जास्त खासगी रुग्णालयात कोरोनावरील लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख ९० लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि दररोज किमान एक लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी आता खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. 
 
मुंबईत कोरोनावरील लसीकरण वाढवण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आढावा व नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनीही आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, विविध खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी आदींना मार्गदर्शन केले. मुंबईत सध्या ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. ९ मार्चपर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील १५ हजार २७२ व्यक्तींना लसीकरण झाले आहे.
 
२४ तास लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३० लाख असून दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास एका महिन्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा आत्मविश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments