Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

40 बांगलादेशींना भिवंडीतून अटक, आरोपींकडून बनावट कागदपत्रे जप्त

Webdunia
बुधवार, 1 डिसेंबर 2021 (10:52 IST)
मुंबईला लागून असलेल्या भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 40 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत अटक केली आहे. बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही देशात बेकायदेशीरपणे राहणारे अनेक बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या कारवाईत अडकले आहेत. या आरोपींकडून बनावट भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि लाखो रुपयांचे मोबाईल फोनसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. 
 
गुप्त माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या अनेक पोलिस ठाण्यांच्या वेगवेगळ्या पथके तयार करून ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्वजण भिवंडीतील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये काम करायचे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी बांगलादेशातील त्यांच्या नातेवाईकांशी इमो अॅपद्वारे बोलायचे आणि बनावट कागदपत्रे बनवून येथे लपून बसले होते. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून 94,900 रुपये, 28 मोबाईल फोन, भारतीय पासपोर्ट आणि इतर भारतीय कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे.
 
त्यांना बेकायदेशीरपणे भारतात आणणाऱ्या एजंटचा आणि बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पोलिस आता शोध घेत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

पुढील लेख
Show comments