Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत हिरा व्यापाराची गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात उडी घेत आत्महत्या

Webdunia
सोमवार, 22 जुलै 2024 (16:47 IST)
व्यवसायात तोटा झाल्यामुळे मुंबईत एका हिरा व्यापाराने गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय शहा(65) असे या हिरा व्यापाराचे नाव आहे. 

ते महालक्ष्मी परिसरात एका अपार्टमेंट मध्ये राहत होते. त्यांच्या परिवारात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. मयत संजय शहा यांचे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये कार्यालय होते ते तिथे हिरा व्यवसायी होते. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. 

त्यांना व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे ते तणावात होते. तणावात येऊन त्यांनी रविवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया जवळ ताज हॉटेलच्या समोर अरबी समुद्रात उडी घेतली आणि आत्महत्या केली. 
रविवारी सकाळी मॉर्निग वॉक साठी जायचे सांगून शहा यांनी टॅक्सी घेतली आणि वांद्रे वरळी सी लिंकवरून जीव देण्याचा प्रयत्न केला मात्र, टॅक्सी चालकाने तिथे गाडी थांबविण्यास नकार दिला. नंतर त्यांनी टॅक्सी चालकाला गेटवे ऑफ इंडियाला नेण्यास सांगितले आणि तिथे समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांना बोलावले. 

समुद्राच्या उंच लाटांमुळे त्यांना वाचवता आले नाही. दोरीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले त्यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे. 

काही दिवसांपूर्वी वरळी- बांद्रा सी लिंक वरून कर्जबाजारामुळे वैतागून भावेश शेठ यांनी समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती.भावेश यांच्या वाहनातून सुसाईड नोट सापडली असून त्यांनी आपल्या मुलाला फोन वरून कल्पना दिली होती. 

तसेच ममता कदम नावाच्या 23 वर्षीय तरुणीने वैयक्तिक कारणामुळे मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती. 
 
Edited by - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Toy Train माथेरानला जाण्यासाठी प्रवाशांची प्रतीक्षा संपणार, नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार!

आमदार मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना धारेवर धरले, कोविड काळात BMC मधील भ्रष्टाचाराचा संपूर्ण हिशेब मागितला

आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात, लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी म्हणाले- राजकारण करू नका, मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवा

महाविकास आघाडीत सर्व जागांवर एकमत, 25 जागांवर घेणार हायकमांड अंतिम निर्णय

पुढील लेख
Show comments