Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

Webdunia
सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (21:24 IST)
पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर एक धक्कादायक घटना घडली होती. मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.
 
सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यामधील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. गावाकडे जमीन हडपल्याच्या वादातून देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २३ ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली होती. या प्रकरणी देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झूंज अखेरी ठरली. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी दुपारी बाराच्या सुमारास सुभाष देशमुख यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments