Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या प्रसवासाला, लवकर मुंबईतून परतणार

Webdunia
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (08:05 IST)
हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता, व तसेच तो खरा देखील ठरला आहे.
 
देशातून दक्षिण-पश्चिम मान्सूनचे प्रस्थान  सुरू झाले असून मान्सून महाराष्ट्रातून देखील परतीच्या प्रवासाला निघाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग नुसार, नंदुरबार जिल्ह्यातून मान्सून 2024 माघार घेण्यास सुरुवात झाली असून येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे.
 
तज्ज्ञाच्या मते, नैऋत्य मोसमी पावसाची माघार 5 ऑक्टोबरपासून सुरू झाली, ही महाराष्ट्रात परतीची सामान्य तारीख आहे. लवकरच तो संपूर्ण नंदुरबारमधून माघार घेणार असून येत्या दोन-तीन दिवसांत राज्याच्या अधिक भागातून मान्सून माघार घेईल, असा अंदाज आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे यंदा महाराष्ट्रातून मान्सून माघार घेण्यास विलंब होऊ शकतो, असा अंदाज  हवामान तज्ज्ञांनी यापूर्वी वर्तवला होता. तसेच मान्सूनच्या माघारीच्या प्रक्रियेला लवकरच वेग येण्याची शक्यता आहे.
 
देशातील मान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचतो आणि सप्टेंबरच्या मध्यापासून त्याचे प्रस्थान सुरू होते. तसेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत रिमझिम पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे आणि या दरम्यान मान्सून निघू शकतो. तर साधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मान्सून निघून जातो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला

नाशिकात प्रभू श्रीरामाच्या 70 फूट उंच मूर्तीचे अनावरण

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात राहुल गांधी, ओवेसींची निष्पक्ष तपासाची मागणी

भारताने बांगलादेशचा 3ऱ्या T20 मध्ये 133 धावांनी पराभव केला

ब्राझीलमध्ये विनाशकारी वादळामुळे लाखो लोक बेघर, 7 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments