Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर हल्ला

Webdunia
सोमवार, 21 मार्च 2022 (15:33 IST)
मुंबई  महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर दिव्यात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

या हल्ल्यात विजया रक्तबंबाळ झाल्या आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, विजया यांच्यावर हल्ला नेमका कुणी केला आणि त्यांच्यावरील हल्ल्यामागील नेमकं कारण काय? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.पण संबंधित घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. विजया पालव यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची भूमिका देखील साकारली आहे.

राहत्या इमारतीचा वाढवलेला मेंटेनन्स आणि घरात केलेल्या अंतर्गत कामाच्या वादातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारहाणीनंतर पालव यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवलं आहे. या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना देण्यात आली असून याचा तपास केला जात आहे. संबंधित घटना रविवारी घडली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लावणीसम्राज्ञी विजया पालव ज्या इमारतीत राहतात, त्या इमारतीतील रहिवाशांकडून मेंटेनन्स जमा करण्याचं काम बिल्डर करतो. संबंधित इमारतीचा मेंटेनन्स 800 रुपये होता. पण बिल्डरने मेंटेनन्सच्या रकमेत जवळपास दुप्पट वाढ केली. त्याने 800 रुपयांवरून थेट 1500 रुपये केला होता. यामुळे संबंधित इमारतीतील रहिवासी बिल्डरवर संतापले होते. अशात मेंटेनन्सच्या रकमेत भरमसाठ वाढ केल्याने विजया पालव आपल्या काही महिला साथीदारांसह जाब विचारण्यासाठी संबंधित बिल्डरकडे गेल्या होत्या.
त्यांच्या नृत्यकलेमुळे त्यांना लावणी सम्राज्ञी, लावण्यवती, लावणी क्वीन अशा अनेक नावांनी त्या ओळखल्या जातात. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार, बक्षिसे मिळाली आहेत.त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आल्याने मराठी चित्रपट सृष्टीसह चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संबंधित माहिती

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments