rashifal-2026

अनैतिक संबधातून बारबालेचा खून !

Webdunia
सोमवार, 22 मार्च 2021 (16:03 IST)
मुंबईच्या डोंबिवलीत अनैतिक संबधातून बारबालेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल सीडीआरद्वारे हत्येचा उलगडा करत पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरती अरूण सकपाळ (वय 47, रा. डोंबिवली) असे खून झालेल्या बारबालेचे नाव आहे. तर श्रीनिवास बसवा मडीवाल (वय 34, रा. रूचिरा बार, कल्याण, मूळगावः रा. थोमबाटू, जिल्हा : उडपी, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथे राहणा-या आरती सपकाळ हीचा शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरात साडीने गळा आवळून खून झाला होता. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सुरु होता. दरम्यान मयत आरती काम करत असलेल्या कल्याणच्या रूचिरा बार येथे काम करणारा श्रीनिवास मडीवाल याच्यावर पोलिसांची संशयाची सुई स्थिरावली. आरतीच्या मोबाईलचा सीडीआर तपासला. त्यात तिच्यासोबत बारमध्ये करणारा तिचा सहकारी श्रीनिवास मडीवाल याच्याशी दररोज बोलणे होत असल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला कल्याण स्टेशनच्या पुलावरून ताब्यात घेतले. अशाप्रकारे आरतीच्या खुन्याच्या गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. आर्थिक आणि अनैतिक संबंधातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. विष्णूनगर पोलिस तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Sarojini Naidu Death Anniversary सरोजिनी नायडू पुण्यतिथी

युद्धामुळे शेअर बाजार कोसळला

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून भाविकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

अजित पवारांचा मृत्यू १००% कट, विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला

पुढील लेख
Show comments