Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील कर्फ्यूनंतर स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी, मध्यरेल्वेने लोकांना आवाहन केले

Webdunia
बुधवार, 14 एप्रिल 2021 (12:33 IST)
कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर कडक निर्बंध लादल्याच्या दुसर्‍याच दिवशी, बुधवारी लोकमान्यटिळक टर्मिनसबाहेर लोक लांब पल्ल्याची रेल्वे पकडण्यासाठी जमले. मध्य रेल्वे ने लोकांना अस्वस्थ होऊ नये आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.
 
लोकमान्य टिळकटर्मिनसच्या बाहेर गर्दी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दल आणि शासकीय रेल्वे पोलिसांनी अतिरिक्त सैन्यदल तैनात केले आहेत.
 
कोविड – 19 च्या अनपेक्षित लहरीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी पुढील 15 दिवस बंदी घालण्याची घोषणा केली. आवश्यक सेवा वगळता बुधवारी रात्री 8 वाजता ते दुपारी 1 मे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध चालू राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 144 लागू राहील. 
 
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, लोकांनी घाबरू नये आणि रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये. ते म्हणाले की आधीच आरक्षित तिकीट असलेल्या परवशांनाच विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी आहे आणि रेल्वे सुरू होण्याच्या वेळेच्या दीड तासाच्या आधी स्टेशनवर पोहोचावे लागेल.
 
ते म्हणाले की, रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी आणि विशिष्ट गंतव्य स्थानासाठी तिकिटांच्या मागणीवर मध्य रेल्वे सातत्याने लक्ष ठेवून आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments