Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (07:32 IST)
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झालाय. एटीएसनं हा गुन्हा दाखल केला. मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी केली होती. त्यानंतर एटीएसनं हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसनं सगळी कागदपत्रं मुंब्रा पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेतलीयत आणि पुढचा तपास सुरू केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या शरीरावर जखमा आढळल्या नाहीत. त्यांच्या मृतदेह जवळपास 10 तास पाण्यात असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे.  पण या खुणा कधीच्या आहेत, हे मात्र कळू शकलेलं नाही. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या नागपुडीजवळ दीड सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरती लाल खूण आहे. चेह-याच्या उजव्या बाजूकडील गालावर ८ सेंटीमीटर बाय ३ सेंटीमीटर एवढी मोठी गडद लाल रंगाची खूण आहे. इतकंच नाही तर उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खूण आहे.
 
मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणताही घातपात नसल्याचा उल्लेख तसंच शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याची माहिती समोर आलेली. मात्र आता विस्तृत अहवालानुसार शरीरावर काही खुणा असल्याचं उघडकीस आलं आहे.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments