Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीपेक्षा मुंबईची हवा जास्त विषारी? धोकादायक पातळीवर प्रदूषण

Webdunia
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (15:07 IST)
राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचा मुद्दा तापला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. पण एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे की, सोमवारी मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त विषारी होती. समुद्रावरून येणारे वारे, वाऱ्याचा वेग कमी होणे आणि अनेक वाहनांची ये-जा यामुळे दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त विषारी बनली आहे. दक्षिण मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सोमवारी 345 अंकांवर पोहोचला. तर सोमवारीच दिल्लीत हवेचा दर्जा 331 होता. त्यामुळेच आता मुंबईतील प्रदूषणाची पातळी दिल्लीशी स्पर्धा करू लागली, तर इथेही ‘प्रदूषण लॉकडाऊन’ होऊ नये, अशी भीती मुंबईकरांना सतावत आहे.
 
मुंबईतील कुलाबा येथील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे आढळून आले. यानंतर माझगावचा क्रमांक लागतो. येथे हवेचा दर्जा निर्देशांक 325 असल्याचे आढळून आले. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सबद्दल सांगायचे तर, येथे हवा गुणवत्ता निर्देशांक 314 आणि मालाडमध्ये 306 होता. अंधेरीही त्यांच्या मागे नाही. अंधेरीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 259 असल्याचे आढळून आले. जेव्हा हवेचा दर्जा निर्देशांक वाढू लागतो, तेव्हा आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे दमा आणि श्वसनाचे आजार उद्भवतात.
 
मुंबईतही तापमानात सातत्याने वाढ होत आहे
इथे मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात हवेची गुणवत्ता तर घसरत आहेच, पण हिवाळ्यातही उष्णतेची जाणीव वाढत आहे. मुंबईत दिवसा तापमानात अचानक वाढ होते. दिवसाचे तापमान 35.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तापमान वाढल्याने हवेच्या गुणवत्तेतही फरक दिसून येत आहे. रविवारबद्दलही बोलायचे झाले तर हवेची गुणवत्ता 245 AQI नोंदवली गेली. दिवाळीच्या दिवशीही मुंबईतील हवेची गुणवत्ता इतकी खराब नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता 164 AQI नोंदवण्यात आली. दोन दिवसांनंतर, हा 221 AQI नोंदवला गेला.
 
वातावरणातील या अचानक बदलाचे कारण
वातावरणातील बदलांचा अभ्यास करणाऱ्या स्कायमेट या संस्थेच्या तज्ज्ञांच्या मते, उष्ण वाऱ्यांचा प्रवाह उत्तर-पश्चिम दिशेकडून सुरू होत आहे. त्यामुळे शहरातील तापमानात वाढ होत आहे. 21 आणि 22 नोव्हेंबरपर्यंत तापमान असेच राहील. त्यानंतर तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. कर्नाटकच्या किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. त्यामुळे 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments