Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिली मासिक पाळी आल्यानंतर तणावाखाली मुंबईच्या 14 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली

Mumbai Girl suicide after first period
Webdunia
गुरूवार, 28 मार्च 2024 (13:06 IST)
मुंबईच्या मालवणी भागात 14 वर्षांच्या मुलीच्या कथित आत्महत्येने लोकांना धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली आणि तिला खूप वेदना होत होत्या. यामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मयत मुलगी तिच्या मासिक पाळीच्या कमी आणि चुकीच्या माहितीमुळे तणावाखाली होती.
 
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टप्रमाणे, पोलिसांनी सांगितले की मुलीने 26 मार्चच्या संध्याकाळी आत्महत्या केली. त्यावेळी घरी कोणी नव्हते. मुलीचे शेजारी आणि नातेवाईक तिला घेऊन कांदिवली येथील शासकीय रुग्णालयात गेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मृलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, तिला पहिल्यांदा मासिक पाळी आल्याने तिला त्रास झाला होता. तीव्र वेदनांमुळे ती मानसिक तणावाखालीही होती. 
सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस मृत मुलीच्या फ्रेंड्सशी बोलून त्याच्या मानसिक तणावाबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय मुलीच्या ऑनलाइन अॅक्टिव्हीटीबद्दल माहिती संकलित केली जाणार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल.
 
आणखी अनेक प्रकरणे
पहिल्या पाळीमुळे आत्महत्येची ही पहिलीच घटना नाही. 16 मे 2019 रोजी दिल्लीतील बुरारी परिसरात 12 वर्षांच्या मुलीने याच कारणावरून आत्महत्या केली होती. तिच्या मोठ्या बहिणीने सांगितले होते की, तिला पहिल्या मासिक पाळीच्या वेदनामुळे त्रास झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री नायडू देणार प्रत्येकी १० लाख रुपये

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गुरुवारी सर्वपक्षीय बैठक घेणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनाऱ्यावर सुरक्षा वाढवण्यात आली

पीडितांचे दुःख पाहून मन दुखावले...पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले

पुढील लेख
Show comments