Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणेंची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करुन होणार जनआशीर्वाद यात्रा

Webdunia
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (11:15 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. मुंबईत विमानतळावर पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या यात्रेला सुरुवात होतेय. 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत ही यात्रा होणार आहे.
 
नारायण राणे हे मुंबई शहर, उपनगर, वसई - विरार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत ही यात्रा असेल. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची ही यात्रा महत्वाची मानली जात आहे. नारायण राणे यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिल्याचंही भाजपकडून सांगण्यात येत आहे.
 
आज नारायण राणे हे मुंबई शहरातल्या दादर, सायन, चेंबूर, चुनाभट्टी, गिरगावपासून ते हुतात्मा चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी दौरा करतील. दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
 
20 ऑगस्टला मुंबई उपनगरातल्या शिवसेना प्रभावी असलेल्या भागात ते दौरा करणार आहेत. त्यानंतर एक दिवस वसई- विरार आणि तीन दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा दौरा करतील.

संबंधित माहिती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की कट?

महाराष्ट्रातील आकोल्यामध्ये 2 बाईकची समोरासमोर धडक झाल्याने 2 चिमुकल्यांसोबत 3 लोकांचा मृत्यू

पुण्यामध्ये अनियंत्रित कारने दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

पहिले आरएसएस ची गरज होती, आता भाजप स्वतः सक्षम- जेपी नड्डा यांचा जबाब

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू?

एकाच तरुणाने केले 8 वेळा मतदान!एफआयआर नोंदवला

मतदानापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नोटीस देऊन उठवत आहे पोलीस- शिवसेना(युबीटी)चा आरोप

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनर अपघातानंतर आग;एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments