Festival Posters

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

Webdunia
गुरूवार, 2 जुलै 2020 (08:56 IST)
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ३ आणि ४ जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. 
 
जुलै महिन्यात भरपूर पाऊस पडेल अशीही शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसापासून पाऊस पडत नसल्यामुळे प्रचंड उकाडा झाला होता. हवामानात बदल झाल्याने ही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय उत्तर भारतातीलही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकाराने जनतेला पावसाळ्यात जास्त काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात आजार पसरण्याची शक्तया देखील जास्त असते अशात प्रशासनासमोर कोरोनाचा संकट असताना कोरोना आणि या साथींना अटकाव करण्याचं दुहेरी संकट समोर असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments