Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं नेटवर्क ठप्प

Webdunia
शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (14:46 IST)
नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं नेटवर्क ठप्प आहे. साधारपणे 12.15 वाजल्यापासून जिओचं नेटवर्क बंद आहे. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीचं काम करत असून लवकरच सेवा सुरळीत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. जियोचं नेटवर्क ठप्प असल्याने कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे. याचा जियोच्या  ग्राहकांना फटका बसत आहे.
 
कंपनीचे कर्मचारी यावर काम करत आहेत. काही तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हा प्रॉब्लेम लवकरच दुरुस्त केला जाईल आणि सर्वांच्या मोबाईलवर नेटवर्क असेल, अशी प्राथमिक माहिती कंपनीने दिली आहे.
 
दुपारी साधारण 12.15 च्या सुमारास जिओचे नेटवर्क डाऊन होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ट्विटरसह सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याच्या पोस्ट पडू लागल्या. तसेच ग्राहकानी कस्टमर केअरवर कॉल करुन तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जियोचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच Reliance jio कडूनही यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments