Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चला राणीच्या बागेत जाऊ या, राणीच्या बागेचे दरवाजे १५ फेब्रुवारीपासून खुले होणार

Webdunia
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (08:32 IST)
मुंबईतल्या राणीच्या बागेचे दरवाजे येत्या १५ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना, पर्यटकांना राणी बागेतील पक्षी, प्राणी, पेंग्विन जवळून आणि निसर्गाचा सहवास पुन्हा लाभणार आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई महापालिकेने नागरिक, पर्यटक, प्राणी, पक्षी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १५ मार्च २०२० पासून राणीच्या बागेचे दरवाजे बंद करण्यात आले होते.यामुळे  राणी बागेच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या ४५ लाख रुपये इतक्या उत्पन्नाला पालिकेला मुकावे लागले. गेल्या ११ महिन्यांत राणीची बाग कोरोनामुळे बंद ठेवण्यात आल्याने पालिकेचे जवळजवळ ५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र आता पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यांनी परवानगी दिल्यास राणीच्या बागेचे दरवाजे सर्वांसाठी खुली होणार आहे.
 
पालिकेच्या तिजोरीतही राणी बागेच्या माध्यमातून दररोज दीड लाख रुपये जमा होण्यास पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. मात्र राणी बाग पर्यटकांसाठी खुली होण्यापूर्वी मुंबईकरांना, पर्यटकांना कोरोना विषयक योग्य ते नियम पाळणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख