Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'या' परिसरात होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

Webdunia
सोमवार, 13 डिसेंबर 2021 (22:20 IST)
मुंबईच्या वांद्रे येथील एच/पश्चिम भागात ३६ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. कारण १५ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून ते १६ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत तानसा पूर्ण मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगमधील काम हाती घेण्यात येणार आहे. म्हणून कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे या विभागातील नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्यामार्फत माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३६ तास संपूर्ण वांद्रे (पश्चिम) म्हणजेच एच/पश्चिम विभागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. म्हणून सदर परिसरातील नागरिकांनी अगोदरच आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन पालिका जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.
जल अभियंता खात्यामार्फत हाती घेण्यात येणारे काम समय मर्यादेत झाल्यावर वांद्रे (पश्चिम) विभागाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही पालिकेतर्फे करण्यात आली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणत टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 'इथे' मॅच फिरली

विराट कोहली : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या जगातील एकमेव खेळाडूचा प्रवास

ओम बिर्ला : लोकसभा अध्यक्षपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाचीही वादानं सुरुवात

बेलग्रेडमध्ये इस्रायली दूतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला, गोळीबारात हल्लेखोर ठार

विम्बल्डनमध्ये सुमित नागलला कठीण ड्रॉ, पहिल्या फेरीत या खेळाडूशी सामना होईल

सर्व पहा

नवीन

जो बायडन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घ्यायला लागू शकते का?

टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता, गोलंदाजांनी पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली

IND vs SA Final :भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

मोदीजींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचार केला तर आम्ही जिंकू...' शरद पवारांचा पंतप्रधानांवर टोला

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 4 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांन कडून भरपाई जाहीर

पुढील लेख
Show comments