Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या पावसात मरण्याची भीती, भिंत कोसळल्याने करंट लागून मरण्याच्या भीतीने 2 महिला शिडीवर दोन तास उभ्या राहिल्या

Webdunia
रविवार, 18 जुलै 2021 (17:57 IST)
रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर भिंत कोसळल्याने करंट लागण्याच्या भीतीने दोन महिला मुंबईच्या माहुल भागातील झोपडीत एका लाकडी शिडीवर दोन तास उभ्या राहिल्या.माहुलच्या भरतनगर भागात पहाटे 1 च्या सुमारास डोंगरावर वसलेल्या काही घरांमध्ये कंपाऊंडची भिंत कोसळून 15 जण ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
 
या भागात भिंत कोसळल्यामुळे बाहेरच्या लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तेव्हा 40 वर्षीय लक्ष्मी जोंगकर त्यांच्या झोपडीत होत्या. त्यांनी घराची खिडकी उघडली तेव्हा बघितले की बर्‍याच झोपडपट्ट्यांचा नाश झाला होता.पण, त्यांच्या हे लक्षात आले नाही की ढासळणारी माती त्याच्या घरात देखील शिरली आहे आणि त्यांच्या झोपडीचे देखील नुकसान झाले आहे.
 
लक्ष्मीने सांगितले की "लोक घाबरले आणि ओरडू लागले की परिसरात विद्युतप्रवाह पसरला आहे, हे ऐकून मी माझ्या झोपडीत एका अन्य महिला नातेवाईकासह एका लाकडी शिडीवर उभे राहिले आणि दोन तासांनंतर, एक माणूस आमच्याकडे चौकशी करायला आला आणि आम्हाला बाहेर येण्याचे म्हटले " एका महिलेने काठीच्या सहाय्याने दार उघडले आणि घराबाहेर पडण्यास सांगितले.
 
विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे शनिवारी रात्री पासून मुंबईत मुसळधार पाऊस रविवारी सकाळी देखील सुरूच आहे,त्यामुळे विनाश होण्याचे दृश्य दिसत आहे. येथे, भिंत कोसळण्याशी संबंधित दोन स्वतंत्र झालेल्या अपघातात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments