Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईवर पाणीकपातीचे संकट, धरणात फक्त 11 टक्के साठा

Webdunia
शनिवार, 18 जून 2022 (16:07 IST)
मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.मुंबईवर पाणीकपातीचे संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात फक्त 11 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. मुंबईत जुलै अखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट ऐन पावसाळ्यात ओढवणार आहे. मान्सूनने दडी मारल्याने बळीराजाही चिंतेत आहे.
 
जून महिन्याच्या शेवटी मुंबई महापालिका पाण्याच्या साठ्याबाबत आढावा घेऊन याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. आता धरण क्षेत्रात एकूण जलसाठा शिल्लक 160831 दशलक्ष लिटर आहे. तर गेल्यावर्षी याच दिवशी जलसाठा 186719 दशलक्ष लीटर होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठी कमी झाल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे. 
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
- अप्पर वैतरणा -
- मोडक सागर 48357
- तानसा 6088
- मध्य वैतरणा 23719
- भातसा 76788
- विहार 3715
- तुलसी 2164

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments