Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय म्हणता, ४५ रुग्ण महापालिकेच्या रेंजमध्ये नाही

Webdunia
बुधवार, 24 जून 2020 (09:35 IST)
मुंबईतील काही रुग्णालयातून करोनाबाधित रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर काही विभागांमध्ये करोना चाचणी करणारे रुग्णच महापालिकेच्या रेंजमध्ये आलेले नाहीत. मालाडच्या पी-उत्तर विभागातच अशाप्रकारे करोना चाचणी केलेल्या ४५ रुग्णांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नसून अशाप्रकारे महापालिकेच्या २४ विभागांमध्ये शेकडो रुग्णांचा पत्ताच महापालिकेच्या अधिकार्‍यांना लागलेला आहे. मात्र, मालाडमधील घटना समोर येताच आता पोलिसांच्या मदतीने या सर्वांचे ट्रेसिंग करून शोध घेण्याचे काम महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
 
मुंबईतील मालाड येथील पी-उत्तर विभागांमध्ये सध्या ३८०३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मालाडच्या विभागातील करोनाबाधित रुग्णांचा आढावा घेतला, त्यावेळी काही अधिकार्‍यांनी, करोना चाचणी केलेल्या काही रुग्णांचा अद्याप शोध लागत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तीन दिवसांपूर्वी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी ज्या रुग्णांनी तपासणी केली होती आणि ज्यांचे फोन नॉटरिचेबल तसेच घरचा पत्ता सापडत नसल्याने त्यांची यादी नगरसेवकांच्या ग्रुपवर पाठवत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सोमवारी आयुक्तांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा आल्यानंतर, आयुक्तांनी यासाठी पोलिसांची मदत घेऊन या संशयित रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments