Marathi Biodata Maker

मुंबईत मान्सून कधी येणार, आयएमडीने सांगितले

Webdunia
बुधवार, 16 एप्रिल 2025 (11:59 IST)
देशाच्या अनेक भागात पाणी टंचाई आणि उष्णतेचा सामना नागरिकांना करावे लागत आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून 2025 बाबत चांगली बातमी दिली आहे. हवामान विभाग म्हणाले, या वर्षी देशभरात सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. 
ALSO READ: मुंबई रेड झोनमध्ये नितीन गडकरींनी कंत्राटदारांना इशारा दिला
हवामान खात्याने म्हटले आहे की यावर्षी देशात चांगला पाऊस पडेल कारण मान्सूनवर अल निनो (भारतीय मान्सूनवर एएल निनो प्रभाव) चा कोणताही धोका नाही.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकतो आणि नंतर सात ते आठ दिवसांत महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात, विशेषतः मुंबईमध्ये पोहोचतो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, 2025 पर्यंत मान्सून वेळेवर येण्याची अपेक्षा आहे.
ALSO READ: मुंबईकरांना मोठा दिलासा, टँकर युनियनने संप मागे घेतला
हवामान विभागानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. संपूर्ण कोकणात मान्सूनचा पाऊस सुरु होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. 
हवामान विभाग तज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा मान्सून हंगामात भारतात यंदा सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
ALSO READ: 'मी मूर्खांना उत्तर देत नाही...' मुंबई हल्ल्यात RSS च्या भूमिकेच्या दाव्यावर फडणवीस काय म्हणाले?
आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या कालावधीत एकूण पाऊस 87 सेमीच्या दीर्घकालीन सरासरीच्या 105 टक्के जास्त असू शकतो. 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले! महाराष्ट्रातील १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या दोन मित्रांचा गूढ मृत्यू; धुळ्यात भोंदूबाबाने घेतला दोघांचा बळी

कोण आहेत RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सर ? NEET पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात CBI च्या ताब्यात, चौकशी सुरु

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: शाळांचे हस्तांतरण यापुढे मनमानीपणे करता येणार नाही

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीस यांनी नाकारले 'कान्स' महोत्सवाचे निमंत्रण

पुढील लेख
Show comments