Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बालाकोट एअर स्ट्राईकची 3 वर्षे : IAF ने पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले

Webdunia
शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (11:50 IST)
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भीषण स्फोट झाला. सीआरपीएफच्या 78 गाड्यांच्या ताफ्यावर लक्ष होते. या स्फोटात 40 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देशात दु:खाची आणि संतापाची लाट उसळली होती. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हा दहशतवादी हल्ला झाला असून या घटनेवरून राजकारणही तापले असे.
 
दोन आठवड्यांनंतर, मंगळवारी 26 फेब्रुवारी 2019 रोजी, भारतीय हवाई दलाच्या मिराज-2000 विमानाने रात्रीच्या अंधारात नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडली आणि बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांवर सर्जिकल स्ट्राइक केला, नंतर याला 'बालाकोट एअर स्ट्राईक' असे म्हटले गेले. या स्ट्राइकमध्ये मोठ्या प्रमाणात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षण, संघटनेचे प्रमुख कमांडर आणि फिदाईन हल्ल्याची तयारी करणारे जिहादी यांचा खात्मा करण्यात आला.या मध्ये मिराज-2000 विमानाने  1000 किलो बॉम्ब टाकले.या मध्ये 300 दहशतवादी मारले गेले. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या लढाईत भारतीय हवाई दलाच्या मिग-21 ने पाकिस्तानी हवाई दलाचे F-16 विमान पाडल्याचा दावा भारताने केला आहे. पाकिस्तानने मिग-21 हे विमान पाडले आणि विंग कमांडर अभिनंदनला अटक केली. मात्र, दबावाखाली दोन दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments