Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जयपूर येथे ट्रक आणि कारचा अपघात, 5 जण ठार

Webdunia
मंगळवार, 6 जून 2017 (13:24 IST)
मिठाने भरलेला ट्रक कारवर आदळल्याने अपघात झाल्याची घटना पहाटे घडली. यात 5 जण जागीच ठार झाले असून ट्रक चालक फरार आहे.
 
जयपूरच्या चोमू हाऊस सर्कल भागात पहाटे 4 सुमारास ही दुर्घटना घडली. नवा मकरानाहून मिठाने भरलेला हा ट्रक आग्र्याच्या दिशेने जाताना एका कारवर आदळला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे सगळे मालवीय नगर येथील रहिवासी आहेत. ट्रकजवळ 45 टन मिठाची पावती होती. दुर्घटनाग्रस्त कारमधील तरुण व तरुणीचे येत्या 10 दिवसांत लग्न होणार होते.
 
मिठाने भरलेला ट्रक जात असताना अचानक समोरून एक कार आली. त्यामुळे ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो थेट कारवर जाऊन आदळला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितेल. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पाहणी करत आहेत. ट्रकखाली दबलेल्या कारला आता बाहेर काढण्यात आले आहे. रस्त्यावर सर्वत्र मीठच मीठ पसरले असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments