Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित शहांचा शेतकरी नेत्यांना फोन, चर्चेतून आंदोलनाच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता

Webdunia
रविवार, 5 डिसेंबर 2021 (10:13 IST)
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर सरकारनं नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर फोनवर बोलणं झाल्यानंतर सरकारची भूमिका सकारात्मक जाणवल्याचं शेतकरी नेते युद्धवीर सिंह म्हणाले आहेत.
या मुद्द्यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन शहा यांनी दिल्याचं युद्धवीर सिंग म्हणाले. तसंच शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यायलाही सरकार तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सर्वात महत्त्वाच्या किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपीच्या मुद्द्यावर सरकार समिती स्थापन करण्यास तयार आहे. त्यावर संयुक्त किसान मोर्चा राजी असल्याची माहिती मिळत आहे.
संयुक्त किसान मोर्चानं पाच सदस्यांचं पथक बनवून सरकारबरोबर चर्चेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळं या आंदोलनावर तोडगा निघण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments