Festival Posters

भारताने फेटाळला शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप

Webdunia
भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा आरोप हा चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
‘भारतीय सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नाही. भारतीय सैन्य फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देते. यंदाच्या वर्षात झालेल्या एकूण शस्त्रसंधीच्या उल्लंघनापैकी दोन-तृतीयांश उल्लंघनाच्या घटना या मागील पाच आठवड्यांमधील आहेत,’ असे विकास स्वरुप यांनी म्हटले आहे.
 
‘पाकिस्तानकडून भारतीय उच्चायुक्तालयातील काही अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला हा आरोप मान्य नाही. आम्ही हा आरोप फेटाळून लावतो. भारतीय दूतावासातील अधिकारी व्यापार आणि अर्थसंबंध यावर दोन देशांमधील संवाद वाढावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना नाहक त्रास दिला जात आहे,’ अशी माहिती स्वरुप यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments