Festival Posters

'या' कारणामुळे वाढतेय थंडी

Webdunia
शनिवार, 29 जानेवारी 2022 (18:22 IST)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस आणखी थंडीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही तुलनेने थंडी जास्त आहे. पण, यामागचं नेमकं कारण काय आहे?
 
यावेळी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या वेळी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि तीव्र थंडीचा काळ दिसला आहे. विशेष म्हणजे हिवाळा हंगाम सुरू होण्याआधीच हवामान खात्याने ला नियामुळे यंदा उत्तर भारतात थंडीचा काळ लांबणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. इतकेच नाही तर उत्तर भारतातही यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला. याशिवाय दिल्ली आणि उत्तर भारतात दिसणारे धुके यंदाही खूपच कमी होते.
 
कमाल तापमानही अत्यंत कमी
यंदाचा हिवाळा जास्त थंड आणि लांबला आहे. उशिरापर्यंत धुकेही दिसत होते. त्याचवेळी, यावेळी ढगही जास्त असून बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा प्रकोप आहे. 
 
या भागातही अशीच परिस्थिती
यावेळी धुक्याची चादर आता सुरू झाली आहे. पुढील दोन दिवस दाट धुके पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राजस्थान, ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये गडद धुके आणि थंडी दिसून येईल, असेही विभागाने म्हटले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments