Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बडगाममध्ये चकमक, दहशतवादी लतीफसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Webdunia
बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (21:01 IST)
मध्य काश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली, ती संध्याकाळपर्यंत चालली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अमरीन, राहुल भट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येत दहशतवादी लतीफ राथेरचाही हात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
 
एडीजीपी काश्मीर विजय कुमार यांनी या चकमकीला मोठे यश मानले आहे. “लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरून घातक साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. हे आमच्यासाठी मोठे यश आहे.'
 
दरम्यान, सुरक्षा दलांनी उधमपूर-कटरा रेल्वे लिंक आणि उधमपूर रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी विशेष श्वान पथक, जीआरपी आणि आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांचा शोध घेऊन चौकशी केली जात आहे.
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments