Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना सामना वाचावाच लागतो : संजय राउत

Webdunia
बुधवार, 12 मे 2021 (16:35 IST)
शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना सामना वाचावाच लागतो अन् धोरणं बदलावीही लागतात. केंद्रातील नेते सामनाची दखल घेतात. त्यामुळे सामना कोण वाचत नाही यावर लक्ष देऊ नका, असा टोला राऊतांनी नाना पटोले यांना लगावला.
 
“कोण काय म्हणतंय, सामना कोण वाचत नाही त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सामना हा वाचावाच लागतो मग ते दिल्ली असो की गल्ली असेल…त्यानुसार धोरणंही ठरवावी लागतात. सामना काय करु शकतो हे महाराष्ट्रातील सत्तांतरात पाहिलेलं आहे आणि याआधीही पाहिलेलं आहे. आजही सामनाच्या शिरोभागी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव झळकतंय त्यामुळे तीच ताकद सामनाची आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments