Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रत्येकाने पुढे येऊन बोललं पाहिजे : लेखिका नयनतारा सहगल

Webdunia
बुधवार, 30 जानेवारी 2019 (10:03 IST)
प्रत्येकाने पुढे येऊन बोललं पाहिजे, ही काळाची गरज आहे असं वक्तव्य लेखिका नयनतारा सहगल यांनी  केलं आहे. मुंबईत त्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.  यासाठी त्यांनी एका गाण्याचंही उदाहरण दिलं. गाणं किती परिणाम साधू शकतं याचं उदाहरण सहगल यांनी दिलं. नया संसार या सिनेमातील गाण्याच्या ओळी काय होत्या ते नयनतारा सहगल यांनी सांगितलं. ‘एक नया संसार बनाये, एक नया संसार, ऐसा इक संसार की जिसमें धरती हो आझाद, की जिसमे जीवन हो आझाद, की जिसमे भारत हो आझाद, जनताका हो राज जगतमें, जनता की सरकार’ या शब्द सेन्सॉरनेही त्यावेळी पास केले होते असे सांगितले. 
 
सध्याचा काळ कठीण आहे, अशा कठीण काळात एक मोठी शांतता हिंदी सिनेसृष्टीत पसरली आहे. कोणताही कलाकार मात्र शांत आहेत, सगळेच शांत आहेत असं नाही. आनंद पटवर्धन यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत केला होता. बाकी अनेक कलाकार शांत आहेत याची खंत वाटते असंही नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे. 

संबंधित माहिती

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments