Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलग 36 तास झाला तिच्यावर बलात्कार!

Webdunia
बैतुर- सहा नराधमांनी मध्यप्रदेशात आदिवासी महिलेला ओलीस ठेवत आळीपाळी 36 तास सामूहिक बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. बैतुर जिल्ह्यातील या विवाहित महिलेचे त्या नराधमांनी अपहरण करत अत्याचार केला.
 
सहा जणांच्या अत्याचाराची बळी ठरलेल्या त्या विवाहित महिलेला अत्याचारानंतर 13 किलोमीटर पायी प्रवास करत पोलिस स्टेशन गाठले.
 
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी या पोलिस स्थानकातून दुसर्‍या स्थानकात चकरा माराव्या लागल्या. त्या पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
 
तिच्यावर अत्याचार करणार्‍या त्या सहा नराधमांविरुद्ध महिलेने यापूर्वीही पोलिस स्टेशनमध्ये छेडखानीची तक्रार दाखल केली होती मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती.
 
उलट ते सहा नराधम त्या महिलेला तक्रार मागे घे म्हणत धमकावत होते. पण महिलेने तक्रार मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्या नराधमांनी अपहरण करत तिच्यावर आळीपाळीने 36 तास अत्याचार केला.
सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

पुढील लेख
Show comments