Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बालकांच्या मृत्यूचे कारण काय ? हायकोर्टाचा सवाल

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (17:23 IST)

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयात प्राणवायूअभावी ७२ बालकांचा मृत्यू झाला. याबाबत विरोधकांकडून टीका सुरु असतानाच अलाहाबादमधील हायकोर्टानेही राज्य सरकारला जाब विचारला आहे. गोरखपूर रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूचे कारण काय असा प्रश्न हायकोर्टाने सरकारला विचारला आहे.

गोरखपूरमध्ये बाबा राघव दास रूग्णालयात गेल्या आठवड्यात प्राणवायूचा पुरेसा पुरवठा नसल्याने ७२ बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टात याचिका झाली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने सरकारला प्रश्न विचारला. मृत्यूचे कारण काय असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. याप्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्य सरकारला याप्रकरणावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments