Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हृदयद्रावक ! राजस्थानमधील कोटा येथे घरगुती वादाला कंटाळून आईने पाच मुलींसह विहिरीत उडी घेतली

Webdunia
रविवार, 5 डिसेंबर 2021 (15:11 IST)
घरगुती वादाला कंटाळून  एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिने आपल्या पाच मुलींसह विहिरीत उडी घेतली. या महिलेचे पतीसोबत दररोज भांडण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याला कंटाळून महिलेने हे आत्महत्येचे पाऊल उचलले. ही घटना राजस्थानमधील कोटाची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालियाखेडी हे कोटामधील बंजारांचे गाव आहे. येथे राहणार्‍या शिवलालची पत्नी बदामी देवी हिचे शिवलालशी वारंवार भांडणे होत असत. याला कंटाळून बदामी देवीने जीव देण्याचे ठरवले. शिवलालच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी दुपारी 12 वाजता तो घराबाहेर गेला होता. सायंकाळ झाली तरी तो परतला नाही. रात्री त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. बदामी देवी यांनी विहिरीत उडी घेतली तेव्हा त्यांच्या 14 वर्षांची अंजली आणि 7 वर्षांची पूनम या दोन मुली घराबाहेर असण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोघींचे प्राण वाचले. 
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात महिलेने घरगुती वादाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्यानंतरच या घटनेमागचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments