Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिमाचल प्रदेश : किन्नौरमध्ये दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (12:03 IST)
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील भावनगर तालुक्यात दरड कोसळल्याची घटना बुधवारी (11 ऑगस्ट) घडली. या दरडीखाली हिमाचल परिवहन सेवेची एक बस, काही ट्रक आणि काही छोटी वाहनं दबले गेल्याची माहिती मिळत आहे.
 
या दुर्घटनेत 13 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक दबले असल्याची शक्यता वर्तवली जातीये.
 
ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर निगोसारी आणि चौरादरम्यान घडली. याठिकाणी एका डोंगराचा तुकडा अचानक कोसळून खाली आला.
 
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, "दरडीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. पीडितांना शक्य ती मदत प्रशासनाकडून केली जाईल." हिमाचल परिवहन मंडळाची बस मुरंगहून हरिद्वारला जात होती. शिवाय इतर वाहनांमध्ये काही लोक बसलेले होते.
 
दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा प्रशासनाचं बचाव पथक दाखल झालं स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (11 ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झालं. दरड कोसळल्यामुळे गाडल्या गेलेल्या लोकांचं शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडून या घटनेची माहिती घेतली.
 
त्याचा बचाव कार्यात शक्य तितकं सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींना ठाकूर यांना दिल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करून दिली.
 
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भूस्खलन झाल्यामुळे नाहन-श्रीरेणूकाजी-हरिपूरधार रस्ता बंद झाला होता. याठिकाणी जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराला भलीमोठा तडा गेला. यामुळे रस्ताही वाहून गेला. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने लोक रस्त्यातच अडकले.
 
30 जुलै रोजी सिरमौरच्या कामराऊ तालुक्यातील भूस्खलनाचा एक व्हीडिओही व्हायरल झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments