Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केरळमध्ये मानव बळी प्रकरण, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी 2 महिलांचा घेतला जीव

Webdunia
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (11:55 IST)
कोची- केरळमधील एका हृदयद्रावक घटनेत आर्थिक विवंचनेवर मात करण्यासाठी तीन पुरुषांनी दोन महिलांचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी सकाळी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. तेथून त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
 
या प्रकरणातील आरोपी भगवल सिंग, त्याची पत्नी लैला आणि मोहम्मद शफी यांचे जबाब मंगळवारी नोंदवण्यात आले. आर्थिक विवंचनेवर मात करून समृद्धी मिळवण्यासाठी आरोपींनी महिलांचा बळी दिला होता.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींच्या वतीने वकील बी. ए. अलूर प्रस्तु झाले जे अनेक खळबळजनक प्रकरणांमध्ये आरोपीचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांचे वय 50 ते 55 वर्षे दरम्यान आहे. त्यापैकी एक कडवंथरा येथील रहिवासी होती तर दुसरी जवळच असलेल्या काल्डी येथील होती. यावर्षी अनुक्रमे सप्टेंबर आणि जूनपासून त्या बेपता होत्या. त्यांच्या शोधात गुंतलेल्या पोलिसांना तपासादरम्यान ही घटना मानवी बळी याशी संबंधित असल्याची माहिती मिळाली होती.

महिलेच्या अपहरण प्रकरणात एर्नाकुलम येथील शफी नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले असून त्याने महिलेला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देऊन तिला पठाणमथिट्टा येथे नेले. येथे त्यांनी एका तांत्रिकासमोर स्त्रीला मानवी बळी म्हणून सादर केले. सीएच नागराजू यांनी सांगितले की, त्यांचा पठाणमथिट्टा येथे बळी देण्यात आला. मानव बळी विधी तीन जणांनी मिळून केला. महिलेची निर्घृण हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 56 तुकडे करण्यात आले. तांत्रिकाने महिलेचे तुकडे घराच्या मागील अंगणात पुरले. महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्या आहेत.
 

Edited by: Rupali Barve

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments