Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मला ज्वालामुखीशी बोलावं लागेल', स्वराज पुन्हा एकदा भन्नाट उत्तरामुळे चर्चेत

Webdunia
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुन्हा एकदा भन्नाट उत्तरामुळे चर्चेत आल्या आहेत. सुषमा स्वराज यांनी ट्विटरकराला दिलेल्या उत्तराचं लोक कौतुक करत आहेत. एका व्यक्तीने ट्विटरवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इंडोनेशियामधील भारतीय दुतावास आणि बालीमधील काऊन्सिल जनरलला टॅग करत एक सल्ला मागितला होता. या व्यक्तीने ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्टदरम्यान इंडोनेशियामधील बालीमध्ये प्रवास करणं सुरक्षित आहे का ? सरकार यासंबंधी काही माहिती देणार आहे का ? यावर सुषमा स्वराज यांनी यासाठी मला ज्वालामुखीशी बोलावं लागेल असं उत्तर दिलं.
 
सुषमा स्वराज यांच्या उत्तराला ११ हजाराहून जास्त जणांनी लाइक केलं असून दोन हजारापेक्षा जास्त रिट्विट झालं आहे. काहीजणांनी सुषमा स्वराज यांच्या उत्तराचं अनेकांनी कौतुक केलं असून, काहीजणांनी कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नयेत असं मत व्यक्त केलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments