Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

४० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व

Webdunia
शनिवार, 9 मार्च 2019 (09:28 IST)
पुण्यात सुमारे ४० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तानातील हे अल्पसंख्यांक नागरिक अत्याचाराच्या भितीने भारतात पळून आले होते. 
 
पुण्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बऱ्याच वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या ४५ पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करत त्याचे प्रमाणपत्र दिले. यामध्ये ४० वर्षापासून भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्यांचा समावेश होता. भारतीय नागरिकत्व कायद्यात सुधारणा केल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकत्व देण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments