Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Webdunia
गुरूवार, 22 जून 2017 (11:09 IST)
जम्मू काश्मीरमध्ये दक्षिण भागातील पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 

मारले गेलेले दहशतवादी हे 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचे आहेत. दहशतवाद्यांकडून ३ एके-४७ रायफल्ससह  दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. ही चकमक पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा स्थित न्यू कालोनी भागात झाली.  
 
गस्तीवर असणाऱ्या जवानांना पाकव्याप्त काश्मीरमधून काही दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसले. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात ३  दहशतवादी ठार झाले. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments