Dharma Sangrah

झारखंडमध्ये नक्षली आयईडी हल्ल्यात 15 जवान जखमी

Webdunia
मंगळवार, 28 मे 2019 (11:13 IST)
झारखंडच्या सरायकेला खरसावामध्ये नक्षली हल्ल्यात 15 जवान जखमी झाले आहेत. या घटनेत पोलिस आणि कोब्राचे 15 जवान जखमी झाले. ही घटना पहाटे 4.53 वाजेच्या सुमारास घडली. ह्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांवर फायरिंग देखील केली. 
 
जखमी झालेल्या जवानांना रांची येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितलं जात आहे. 
 
खरसावा येथे मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र असल्याच्या माहितीवर जवानांनी खरसावा येथे सर्च ऑपरेशन सुरु केले होते. सर्च ऑपरेशन दरम्यान नक्षलवाद्यांकडून आयईडी बॉम्ब हल्ला करण्यात आला. यानंतर गोळीबार देखील झाला. 
 
सध्या परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पसार झालेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गडचिरोलीत 30 एप्रिल रोजी नक्षल्यांनी पोलिसांना लक्ष्य करून हल्ला केला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments