Dharma Sangrah

पुन्हा तेच, उत्तर प्रदेशात २४ तासांमध्ये १६ बालकांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (11:43 IST)

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघव दास रुग्णालयात गेल्या २४ तासांमध्ये १६ बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या १६ बालकांपैकी १० बालकांवर एनआयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तर उर्वरित ६ बालकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

मेंदूशी संबंधित आजारांमुळे आतापर्यंत गोरखपूर आणि शेजारीत भागांमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये १६ बालकांनी जीव गमावल्यामुळे बाबा राघव दास रुग्णालयात मृत पावलेल्या बालकांची संख्या ३१० वर पोहोचली आहे. याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये बाबा राघव दास रुग्णालयात २० बालकांना उपचारांसाठी दाखल करुन घेण्यात आले आहे. यामध्ये देवोरियातील ६, खुशीनगरमधील २, गोरखपूर आणि महाराजगंज येथील प्रत्येकी ४, बस्ती आणि बलरामपूर येथील प्रत्येकी एका बालकाचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments