Dharma Sangrah

‘पंतप्रधान मोदी फक्त मोठ्या गोष्टी बोलतात, मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल

Webdunia
सोमवार, 28 एप्रिल 2025 (21:35 IST)
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आणि ते म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत हे देशाचे दुर्दैव आहे.
ALSO READ: जर पाकिस्तानने पीओके देण्यास नकार दिला तर भारताने युद्ध करावे', आठवलेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
मिळालेल्या माहितीनुसार खरगे आज येथे 'संविधान वाचवा' रॅलीला संबोधित करत होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करताना ते म्हणाले, आपल्या देशाचे दुर्दैव आहे की सर्व पक्षांचे लोक बैठकीला आले पण  मोदीजी आले नाहीत.ते म्हणाले की ही लज्जास्पद बाब आहे.
ALSO READ: मुंबईतील ईडी कार्यालयात भीषण आग
ते म्हणाले, "जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला गेला तेव्हा तुम्ही बिहारमध्ये निवडणूक भाषणे देत राहिलात पण तुम्ही दिल्लीत येऊ शकला नाहीत. दिल्ली तुमच्यासाठी बिहारपासून दूर आहे का? असा प्रश्न खर्गे यांनी उपस्थित केला. 

Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: 'दहशतवाद संपला पाहिजे पण त्यावर राजकारण होऊ नये', पहलगाम हल्ल्यानंतर अबू आझमी यांचे मोठे विधान

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments