Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : पंतप्रधानमोदी विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांना म्हणाले- मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, मी जिवंत परत आलो

Webdunia
बुधवार, 5 जानेवारी 2022 (17:40 IST)
फिरोजपूरमध्ये रॅलीसाठी येणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी  चूक झाल्या मुळे केंद्र आणि पंजाब सरकारमध्ये संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भटिंडा विमानतळावर पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले की मी जिवंत परत येऊ शकलो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारने फिरोजपूर आणि फरीदकोटच्या एसएसपींना निलंबित केले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. गृह मंत्रालयाने या प्रकरणी पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. याशिवाय भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करून पंजाब सरकारवर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. 
पंजाबसाठी हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी पंतप्रधानांच्या दौऱ्यात व्यत्यय आला हे दुःखद असल्याचे नड्डा म्हणाले. लोकांना रॅलीत येण्यापासून रोखण्याच्या सूचना राज्य पोलिसांना देण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर आरोप करताना नड्डा म्हणाले की, यावेळी चन्नी यांनी फोनवर बोलण्यास किंवा हा प्रश्नसोडविण्यास नकार दिला.
नड्डा म्हणाले की, पंत प्रधानांना भगतसिंग आणि इतर शहीदांना आदरांजली वाहायची आणि मोठ्या विकासकामांची पायाभरणी करायची आहे, याचीही पर्वा पंजाब सरकारने केली नाही.पंजाबच्या काँग्रेस सरकारने ते विकासविरोधी असल्याचे दाखवून दिले आहे. आणि स्वातंत्र्यसैनिकांबद्दलही त्यांना आदर नाही. पराभवाच्या भीतीने पंजाबच्या काँग्रेस सरकारने पंतप्रधानांना रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments