Marathi Biodata Maker

प्रियांका गांधी भाजपवर निशाणा साधत म्हणाल्या वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेचे राजकारण केले

Webdunia
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (09:39 IST)
काँग्रेस सरचिटणीस आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रियांका गांधी यांनी सोमवारी आरोप केला की भारतीय जनता पक्ष या वर्षी जुलैमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेचे राजकारण करत आहे. 
 
या नैसर्गिक आपत्तीत शेकडो लोक मरण पावले आणि अनेक लोक बेघर झाले. निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना त्यांनी सुलतान बथेरी विधानसभा मतदारसंघातील केनिचिरा येथे एका पथसभेला संबोधित केले.त्या म्हणाल्या की, "ज्या आपत्तीमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले, त्याचेही राजकारण भाजपने केले आहे. आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे तुम्हाला तुमचा देश, तुमच्या गरजा आणि तुम्हाला हव्या असलेल्या राजकारणाचा विचार करावा लागेल."  
 
मिळालेल्या माहितीनुसार भाजपवर निशाणा साधत प्रियंका म्हणाल्या की, देशभरात द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे राग, फूट आणि विनाश. तसेच जनतेसमोरील खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या. प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजपच्या राजकारणाचा उद्देश केवळ तुमच्या समस्यांवरून तुमचे लक्ष वळवणे हा आहे, कारण कितीही किंमत मोजावी लागली तरी सत्तेत राहणे हाच एकमेव उद्देश आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments