Festival Posters

सचिनचा भारतरत्न काढून घ्या, संभाजी ब्रिगेडने केली मागणी

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:36 IST)
शेतकरी आंदोलनात सचिन तेंडुलकरने केंद्र सरकारचे समर्थन केल्यानेच सचिनवर टीकेची झोड उडाली आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेडने सचिनला लक्ष्य करत सचिनचा भारतरत्न काढून घ्या अशी मागणी केली आहे. भाजप समर्थनाचा हा करंटेपणा सेलिब्रिटी जमातीमध्ये दिसून आलेला आहे. शेतकऱ्याने जर शेतात नाही पेरल तर सेलिब्रिटी काय खाणार असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे. जर शेतकऱ्यांनी पेरा केला नाही, तर सेलिब्रिटी काय धतोरा खाणार का असेही संभाजी ब्रिगेडने विचारले आहे. 
 
सचिन तेंडुलकर जो गेले सहा वर्षे कुंभकर्णासारखा झोपला होता, कधीही संसदेत उपस्थित राहिला नाही, त्याने एक चकार संसदेच्या सभागृहात मांडला नाही. सचिनसारखे लोक जर जगाच्या पोशिंद्याच्या बाबतीत बोलत असतील तर हा करंटेपणा असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. भारतात संघाच्या लोकांची चापलूसी करायची आणि भारतरत्नसारखे पुरस्कार घ्यायचे. म्हणूनच सचिन तेंडुलकरचा भारतरत्न मागे घ्याला हवा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments