rashifal-2026

रास्तभाव दुकानांतून आता साखर गायब

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:11 IST)

आता फक्त अंत्योदय योजनेतील गरिबातील गरीब कुटुंबांना साखर मिळणार आहे. मात्र त्याचाही दर पाच रुपयांनी वाढविण्यात आला आहे. साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजेनीतील कुटुंबांना महिन्याला फक्त एकच किलो साखर मिळणार आहे. केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने राज्यातील दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) सुमारे ४५ लाख कुटुंबांना रास्तभाव दुकानांतून मिळणारी साखर बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. 

केंद्र सरकारकडून बीपीएल व अंत्योदय कुटुंबांना स्वस्त दरात साखर वितरित करण्यासाठी अनुदान मिळत होते, परंतु केंद्राने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान दिले जाईल, असे राज्य सरकारला कळविले. केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने त्याचा ४५ लाख बीपीएल कुटुंबांना फटका बसला आहे. त्यांना रास्तभाव दुकानांतून आता साखर मिळणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments