Marathi Biodata Maker

SC ने म्हटले, कुठलाही कायदा लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही

Webdunia
लग्नानंतर पत्नीच्या धर्मांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. “एखाद्या महिलेने दुसऱ्या धर्मातील पुरुषाशी लग्न केलं तर तिचा धर्म बदलणार नाही. अशाप्रकारचा कोणताही कायदा भारतात नाही,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
 
लग्न झाल्यानंतर महिलेचा धर्म हा तिच्या पतीच्या धर्मात विलीन होतो, आणि तिला पतीच्या धर्माचं पालन करावं लागतं, असं कुठल्याही कायद्यात म्हंटलेलं नाही. असं सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय.
 
एका पारशी महिलेच्या याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं हा निर्वाळा दिलाय. पारसी महिलेचं लग्न दुस-या धर्मातल्या पुरुषाशी झालं, तर ती महिला पारसी धर्माचं पालन करण्याचे अधिकार गमावते, असं गुजरात हायकोर्टानं 2010 मध्ये म्हंटलं होतं. त्यासाठी कोर्टानं पारंपारिक कायद्याचा दाखला दिला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments