क्षली हल्ला: छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षली हल्ल्यात आयटीबीपीचे दोन जवान शहीद झाले. हल्ला केल्यानंतर नक्षलवादी सैनिकांची शस्त्रे घेऊन पळून गेले. बस्तर रेंजचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, कडेमेटा येथील आयटीबीपी कॅम्पजवळ रात्री 12:10 वाजता नक्षली हल्ल्यात दोन आयटीबीपी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस) जवान शहीद झाले. ते म्हणाले की, एक एके -47 रायफल, दोन बुलेट प्रूफ जॅकेट आणि वायरलेस सेट लुटून नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले.