suvichar

उत्तर प्रदेशच्या बरेलीत बस-ट्रकच्या धडकेत 22 लोक जिवंत जळाले

Webdunia
सोमवार, 5 जून 2017 (13:26 IST)
उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बसला ट्रकची धडक लागताच आगडोंब उडाला. आगीच्या भडक्यात 22 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच इतर 15 प्रवाश्यांना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.
 
बरेली जिल्ह्यातील बिथरीचैनपूर परिसरात हा अपघात घडला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रविवारी रात्री उशीरा 2 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-24 वर दिल्लीहून बस येत होती.
 
सुत्रांच्या माहितीनुसार, बस चुकीच्या बाजूने येत होती. त्यामुळे, लखनौच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक बसली. ट्रकची धडक लागताच बसच्या डीझेल टँकमध्ये स्फोट झाला. यानंतर लागलेल्या आगीत काही क्षणांतच बसचा कोळसा झाला.
 
या आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावर पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकारी हजर असून सविस्तर तपास केला जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments