Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कडकडत्या थंडीत राहुल केवळ टी-शर्टमध्ये का फिरताय, मध्य प्रदेशातील 3 मुलींचा काय संबंध?

Webdunia
चंदीगड- 'भारत जोडो यात्रे' दरम्यान कडाक्याची थंडी असतानाही टी-शर्ट घालण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याचे कारण सांगितले.
 
राहुल मध्य प्रदेशात असताना फाटक्या कपड्यांमध्ये थरथरणाऱ्या 3 गरीब मुलींना भेटल्यानंतर मी मोर्चात फक्त टी-शर्ट घालणार असा निर्णय घेतला.
 
हरियाणाच्या अंबालामध्ये राहुल म्हणाले, 'लोक मला विचारतात की मी हा पांढरा टी-शर्ट का घातला आहे, मला थंडी जाणवत नाही का? मी तुम्हाला कारण सांगतो. प्रवासाची सुरुवात झाली तेव्हा केरळमध्ये हवामान उष्ण आणि दमट होते, पण जेव्हा आम्ही मध्य प्रदेशात प्रवेश केला तेव्हा थोडं थंड होतं.'
 
ते म्हणाले की 'एक दिवस तीन गरीब मुली फाटक्या कपड्यात माझ्याकडे आल्या... मी त्यांना धरले तेव्हा त्या थरथर कापत होत्या कारण त्या नीट कपडे घातलेल्या नव्हत्या. त्या दिवशी मी जोपर्यंत थरथर कापणार नाही तोपर्यंत टी-शर्ट घालेन, असं ठरवलं.
 
त्या मुलींना एक संदेश द्यायचा आहे, असे गांधी म्हणाले. ते म्हणाले की मी जेव्हा थरथर कापायला लागेन, तेव्हा मी स्वेटर घालण्याचा विचार करेन. मला त्या तीन मुलींना संदेश द्यायचा आहे की जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर राहुल गांधींनाही थंडी जाणवेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments